सोपे मराठी सुविचार
स्वातंत्र्य म्हणजे देशभक्तांनी सांडलेल्या रक्ताचे फळ होय.
विद्यार्थी हा ज्ञानरूपी सागरात पोहणारा राजहंस आहे.
निराशा ही आशेची छोटी बहीण आहे.
तारुण्याचा काळ हा पुढील जीवनाचा मार्गदर्शक असतो.
संस्कार आणि विकास जो साधतो तो मनुष्य व जो साधत
नाही तो पशु होय!
अपयशाने डगमगू नका व यशाने फुशारून जाऊ नका.
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
जीवन हे सुख व दुःख यांचा संगम होय.
सुखात वाटेकरी खूपच असतात. दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो.
श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी.
शिक्षणाने माणसातील अज्ञान संपते.
कष्टाने प्रयत्नांचा डोंगर पार केला तर यशाचा उतार मिळवता येतो
सुख दुःखात आपल्या बरोबर असलेला मित्र, हाच खरा मित्र.
ग्रंथ हेच आपले गुरु.
पुस्तकांनी मनाचा विकास साधतो.
कष्टाने सर्व साध्य आहे.
पशुंना धनाची इच्छा नसते पण तीच इच्छा माणसाला पशु बनवते.
सत्य हेच अंतिम समाधान असते.
नशिबाने पुत्र मिळेल पण सुपुत्र मिळणार नाही.
कुणीही जन्मतः दुर्जन नसतो. पण त्याला दुर्जन बनवतो तो समाज.
पापी मनुष्याला सत्य हे सापासारखे दंश करत असते.
तुम्हाला कोणाचा मान करायचा नसेल तर करू नका. पण त्याचा अपमानही करू नका.
दानापेक्षाही त्यागाने माणूस मोठा होतो.
दान देताना ते योग्य व्यक्तिला द्यावे.
***********
अपयश ही यशाची पहिली पायरी असते.
अंधारातच आहे उद्याचा उषःकाल.
आशा व निराशा या दोन्ही सख्या बहिणी आहेत.
गर्व असेल तर मित्रही शत्रू बनतात. माणूस हा प्रेमाचा भुकेला आहे.
मानवाने नेहमी प्रयत्नवादी असावे.
धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती श्रेष्ठ.
सर्व फुलात कापसाचे फुल श्रेष्ठ.
स्तुतीला भाळू नका निंदेला घाबरू नका.
विद्यारूपी अंगठी मध्ये विनयरुपी रत्न चमकत असतो.
हसा,खेळा पण शिस्त पाळा.
परोपकार करणारे संतपुरूष फळाची अपेक्षा कधीच ठेवत नाही.
वाईट सवयीपासून लांब रहाता येते पण सवय लागल्यावर लांब रहाता येत नाही.
संयम हे शौर्याचे लक्षण आहे.
अनुभव हा महान शिक्षक आहे.
सूर्य किरणांनी फुले उमलतात तसेच आईच्या प्रेमाने जिवनकळ्या उमलतात…
पैशाने मिळविलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याचे रेशमी प्रेमपाश हे अधिक लवचिक असतात.
विजेच्या लखलखाटापेक्षा समईची शितलता मनाला आल्हाद देते.
प्रेम हे चंद्रासारखे शितल असते.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.
मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका.
मन हे प्रेमाने जिंकायचे असते पैशाने नाही.
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.
देव दगडात नसून तो माणसातच आहे.
आईचे प्रेम हेच सर्वश्रेष्ठ दान आहे.
शब्दासारखं शस्त्र नाही, त्यामुळे त्याचा वापर जपून करा.
मान सांगावा जनात अपमान ठेवावा मनात.
वाईट सवयीपासून लांब रहाता येते पण सवय लागल्यावर लांब रहाता येत नाही.
सूर्य किरणांनी फुले उमलतात तसेच आईच्या प्रेमाने जिवनकळ्या उमलतात…
दया हा मानवाचा धर्म आहे.
कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा महत्त्वाची आहे.
चंद्र व चंदनापेक्षाही सज्जनांचा सहवास अधिक शीतल असतो.
प्रेम म्हणजे मधुर सुवासाने दरवळणारे पुष्प आहे.
खोटी प्रशंसा अत्यंत दु:ख देणारी असते.
मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा.
आत्म्याचा विकास म्हणजे शिक्षण होय.
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.
0 Comments